Posts

घुसमट

Image
  शोषणाचे मूळ मानसिकतेत ब्राह्मणी धर्माने ज्या जाचक अटी समाजावर लादल्या त्या समाजावर इतक्या खोलवर बिंबल्या आहेत. की त्यामुळे समाज एक मोठी घुसमट सहन करत आहे. प्रत्येक जण या घुसमटीने हैराण झाला आहे. तरीही तो स्वत:च कोणा इतरांच्या घुसमटीचे कारण बनत आहे. कुटुंब हा या व्यवस्थेचा महत्वाचा दुवा असून कुटुंब संस्थेवर लादलेल्या या रूढी समाज हजारो वर्षे पाळत आलाय. त्यामुळे या रूढी समाजाच्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की आपण आपल्याही नकळत कुणाचे तरी शोषण करत आहोत. शोषण व्यवस्थेचे घटक आहोत. शोषण व्यवस्थेला मदत करत आहोत हे व्यक्तींच्या लक्षातच येत नाही. त्याबरोबरच आपलेही शोषण होतेय आणि ते आपले प्रियजन करत आहेत. हे देखील त्याच्या लक्षात येत नाही. कारण   शोषण व्यवस्थेचे मुख्य युनिट म्हणजे कुटुंब संस्था होय. आपलेच आई वडील, भाऊ बहिण, नवरा किंवा बायको, नातेवाईक, मुले, शेजारी हे आपले शोषण करत आहेत किंवा आपण आपल्या ही नकळत त्यांचेही शोषण करत आहोत. किंवा त्यास हातभार लावत आहोत हे व्यक्तींच्या लक्षातच येत नाही. कसे ते पाहू. नवविवाहित जोडपे. यामध्ये महत्वाचे बंधन म्हणजे विवाह कुणाशी करावा व कुण...

व्यक्तिमत्व विकास

Image
  व्यक्तिमत्व विकास हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्वाचा भाग आहे. नुसत्या डिग्रीचा स्वविकासामध्ये फारसा उपयोग नाही. त्याला अजूनही काही विशेष प्रयत्नांची जोड लागेल. ही जोड व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणेल. लक्षात घ्या व्यक्ती नुसार हे प्रयत्न बदलतात. दुसरा जे करतो तेच करायला आपण गेलो की आपली फसगत होते. जीवन दिशाहीन आणि भरकटत जाते. त्यासाठी आपण नेमके काय करायला हवे याची अचूक जाण हवी. स्वप्न सर्व प्रथम आपण स्वत:साठी एक स्वप्न बघावे. अजून ५ वर्षांनी किंवा १० वर्षांनी मी कसा असेल? काय करत असेल? यामध्ये शिक्षण, पैसा, कुटुंब, नोकरी / व्यवसाय, आरोग्य, कौशल्य, आपले दिसणे इ. बारीक सारीक बाबींचा समावेश करावा. ही एक प्रकारची आपल्या स्वप्नांची यादीच असेल. आणि मग आपले यापुढचे आयुष्य मग आपण आपल्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी घालवावे. आपल्या स्वप्नांशी अगदी एकरूप व्हावे. त्यासाठी अविरत मेहनत घ्यावी. अगदी वेडे होवून जावे. स्वप्नांना सत्यात उतरवायचे तर स्वत:मध्ये बदल घडवायला हवा. त्यासाठी स्वत:ची ओळख व्हायला हवी. आणि बदल करण्याची दिशा ठरायला हवी. मात्र कशी? चला त...

इशारा : सांस्कृतिक ब्राह्मणीकरण सुरु आहे.

Image
  इशारा : सांस्कृतिक ब्राह्मणीकरण सुरु आहे. हा लेख जानेवारी २००५ मध्ये दैनिक सम्राट आणि क्रांतिसिंह या वृत्तपत्रांमध्ये मध्ये छापून आला होता. आजही हा लेख संभाजी भिडे आणि भीमा कोरेगाव या ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या लेखाचे पुन:मुद्रण करत आहे. इशारा : सांस्कृतिक ब्राह्मणीकरण सुरु आहे. दुर्गा दौड, ब्राह्मण दौड, शिव दौड, धारतीर्थ यात्रा अशी नावे घेवून ही यात्रा कोणता संदेश देते? देशप्रेमाचा? धर्मनिरपेक्षतेचा? की दहशतीचा? हजारो युवकांना बेकारी विषमता दारिद्रयाविरुद्ध लढण्याचे बळ न देता, शिक्षण न देता, इतरांच्या विरुद्ध चिथावणी देणारी ही यात्रा तिचे अंतर्गत हेतू, तिचा असली चेहरा, इथले पोलीस खाते, शासन तपासणार आहे का? ही घंटा यात्रेत मला ऐकावयास मिळाली. म्हणून हे मनोगत मांडत आहे. धारातीर्थयात्रेचे कसले तरी पत्रक २ मुळे झेरॉक्स काढण्यासाठी दुकानात आलेली. उन्हातान्हाने मळकटलेले कपडे व तसेच चेहरे देखील. कमरेला शेला बांधलेला हा मुलगा मला अगदी खेड्यातला व शहरात कसे राहावे हे कळत नसावे असा वाटला. त्यांनी दिलेले पत्रक वाचत होतो. शिवाजी महाराजांचा फोटो त्या पत्रकावर आणि काहीबाही मजकूर. निरनि...